Raosaheb Danave On Thackeray Government | ‘केंद्र कोळसा देत नसेल तर ठाकरे सरकारने…’; रावसाहेब दानवेंचा सरकारवर निशाणा !

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Raosaheb Danave On Thackeray Government | राज्यावर वीज टंचाईचं मोठं संकट आलं आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे लोडशेडिंग (Load shedding) राज्यभर सुरू केलं आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही माहिती दिली होती. मात्र यावरून आता राज्याच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Raosaheb Danave On Thackeray Government)

 

केंद्र सरकारडून राज्यांना बाराशे ते दोन हजार रूपये या दराने कोळशाचा पुरवठा केला जातो. केंद्राने कोळशाची साठवणूक करण्यासाठी अनेकवेळा सांगितलं होतं. मात्र महाराष्ट्र सरकारने (Maharashtra State Government) ती केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कोळसा टंचाई (Coal scarcity) झाली आहे. आता केंद्राच्या नावाने ओरडत असाल तर परदेशातून कोळसा आणावा, असं रावसाहेब दानवे म्हणाले. (Raosaheb Danave On Thackeray Government)

 

राज्यांना कोळसा पुरवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते आणि ती जबाबदारी केंद्राने पार पाडली आहे.
ज्यावेळी केंद्राकडे कोळशाची उपलब्धता होती त्यावेळी राज्य सरकारने त्याची मागणी करून साठवणूक केली नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, राज्य सरकारकडे 3 हजार कोटी थकीत रुपये आहेत. राज्य सरकारने आता खुल्या बाजारातून वीज निर्माण करावी.
ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे वीज पुरवठ्याचं नियोजन होऊ शकलं नसल्याचं दानवेंनी सांगितलं.

 

Web Title :- Raosaheb Danave On Thackeray Government | union minister and bjp leader raosaheb danve criticised maha vikas aghadi thackeray govt over load shedding in the state

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा