असा सुटला जालन्याचा तिढा – जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी युतीमधील नेत्यांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची नेमणूक केली. नव्या जबाबदरीमुळे अर्जुन खोतकर यांची गोची होण्याची शक्यता आहे. तर पक्ष श्रेष्ठींकडून सुंठीवाचून खोकला घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे मात्र नक्की.
अर्जुन खोतकरांची भूमिका काय ? – गेल्या अनेक दिवसांपासून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात जालन्याच्या जागेवरून वाद सुरु होता. अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालन्याच्या जागेवर दावाही केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांचा शब्द अंतिम राहिल असंही खोतकरांनी सांगितलं होतं. मात्र आता दानवेंना उमेदवारी मिळणार असल्याने अर्जुन खोतकर यांची वैयक्तिक भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.