आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला त्यांनी लगावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेर टीका केली आहे.
‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि ब्रीज ऑडिटची चर्चा सुरु होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही’.
‘सर्वात श्रीमंत महापालिका पण आयुष्याची काही किंमत नाही’, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. आता काही अधिकाऱ्यांना निलंबित करत किंवा टार्गेट करत कमला मिल्स, एल्फिन्स्टन पूल आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रमाणे चौकशी बसवली जाईल असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
- सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू ; 31 जखमी
- ठाण्याच्या कोलशेत खाडीत 4 संशयित आढळल्याने खळबळ
- ‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- पुणे : कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात
- धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’