12 दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा दगडानं ठेचून खून झाल्याचं उघड
file photo
रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीमध्ये गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता असलेला १३ वर्षाचा विद्यार्थी निखिल अरुण कांबळे याची दगडाने ठेचून हत्त्या झाल्याच समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मिरजोळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिरजोळे भागातल्या माळरानाच्या एका चरात निखिलला मारून टाकून त्याच्या मृतदेहावर दगड रचण्यात आले होते. मुलाच्या मृतदेहाची ओळख निखिलच्या आईने पटवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी हादरून गेली आहे.
निखिलची हत्या कशासाठी आणि कुणी केली ? याबाबतची माहिती आत्तापर्यन्त समोर आली नाही. याचा तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.