IPL 2021 : स्टार गोलंदाज आर अश्विनची IPL मधून माघार; ट्विट करत सांगितले कारण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली कॅपिटलचा स्टार गोलंदाज आर अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. तसे त्याने ट्विट करीत याची माहिती दिली. कुटुंबातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने आर अश्विनने आयपीएलच्या १४ व्या मोसमातून माघारी घेतली आहे. अश्विनने ट्विटमध्ये म्हटले की, मी उद्या पासून आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं कुटुंब सध्या कोविड १९ च्या विषाणुशी झगडा करत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळण्याची अशा आहे.  काल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हरचा सामना जिंकल्यानंतर अश्विनने हे ट्विट केले आहे.

अश्विनची कामगिरी सुमार
आयपीएलच्या १४ व्या मोसमात आर अश्विनची कामगिरी तशी सुमारच राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सची पुढील लढत २७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेजर्स बंगळुरु शी होणार आहे. कालच्या विजयानंतर दिल्ली आता गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे. असे असले तरी आर अश्विनने गेल्या ५ सामन्यात केवळ एकच बळी मिळविला आहे. त्याला ४ सामन्यांत एकही बळी घेता आलेला नाही.

कालच्या सामन्यात अश्विनला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने ४ ओव्हरमध्ये २७ धावा दिल्या. याबरोबरच दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत व मॅनेजमेंटने सुपर ओव्हर टाकण्यासाठी अश्विनऐवजी अक्षर पटेलवर भरवसा टाकला व त्याने तो सार्थ करुन दाखविला.