जालन्यातून रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चीत : अशोक चव्हाण
file photo
Share
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर येऊन ठेपला आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची आणि आम्हीच विजयी होणार म्हणण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्यामुळे या निकालात रंगत निर्माण झाली आहे.
याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आश्चर्यकारक विधान केले आहे. पत्रकारांनी त्यांना रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, नांदेडमध्ये विजयाचा दावा करणारे दानवेच पराभवाच्या छायेत आहेत. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी बोलताना म्हटले होते कि, नांदेडमध्ये आमचा विजय पक्का असून अशोक चव्हाण यांचा नक्की पराभव होणार आहे. पुढे अधिक बोलताना ते म्हणाले कि, राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील. त्यांनी लोकशाहीत यश-अपयश येतच असतात परंतु, काँग्रेसला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील असेही यावेळी ते म्हणाले.
दरम्यान, इव्हीएम मशिनवर शंका उपस्थित करत त्यांनी राज्यात जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी देखील आपण स्वीकारण्यास तयार असल्याचे देखील यावेळी म्हटले.