कौतुकास्पद ! कोणाला नाही जमलं ते IAS Topper Simi Karan नं करून दाखवलं, एकाच वर्षात IIT अन् UPSC पास, जाणून घ्या कसं केलं ‘प्लॅनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडीसा येथील सिमी करण या मुलीने यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेत पास झाली, परंतु ती फक्त पास झाली नाही तर तिने पहिल्याच प्रयत्नात ग्रॅज्युऐशन करत तर यासोबतच ३३ व्या रँकसोबत टॉपही केलं आहे. तिने IIT इंजिनिअरिंग पदवी घेतली आहे. सिमी करण हिचे हे यश सर्वांनाच एक प्रोत्साहित करणारं आहे. सिमी करण या मुलीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही मेहनत आणि नियोजनामुळं तिने सध्या करून दाखवलं आहे. तिच्या यशाबाबत तिने एका मुलाखतीत तिच्या प्रवासाची माहिती सांगितली आहे.

दरम्यान. सिमी ही ओडिसाची मध्ये राहते. मात्र, तिचं शिक्षण आणि ती लहानाची मोठी भिलाईमध्ये झाली. सिमी नेहमीच एक हुशार विद्यार्थीनी होती आणि शाळेत असतापासूनच तिला चांगले मार्क मिळायचे. सुरूवातीपासून सिमीनं यूपीएससी करायची असं ठरवलं नव्हतं. त्यामुळं तिनं बारावीनंतर ग्रॅज्युऐशन केलं. यासाठी तिनं IITची एन्ट्रान्स दिली आणि सिलेक्ट होऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरु केला. तेव्हा इंटर्नशिप करत असताना ती आसपासच्या झोपडपट्टीतील परिसराती मुलांना शिकवू लागली. याच वेळी तिच्या डोक्यात आलं, की एखाद्या अशा क्षेत्रात काम करावं ज्यामुळे गरजू लोकांना मदत करता येईल आणि सिमीनं यूपीएससी मार्ग धरला.

सिमीने अभ्यासाची अशी केली सूरुवात ?
सिमी म्हणते, की तिनं सर्वात आधी टॉपर्सच्या मुलाखती पाहिल्या आणि इंटरनेटच्या मदतीनं आपल्यासाठी बूक लिस्ट तयार केली. यासोबतच तिनं ही गोष्टही लक्षात ठेवली, की पुस्तकं मोजकीच ठेवून त्यांचाच वारंवार अभ्यास करायचा आहे. ती परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रमालाही तितकंच महत्त्व देते. ती म्हणते, की UPSC च्या अभ्यासक्रमाचं आधी छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करा आणि मग तयारी सुरू करा. यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमाचं ओझं जास्त वाटणार नाही. प्री साठी सिमी उजळणीवर पूर्ण फोकस करण्याचा सल्ला देते. जी पुस्तकं तुमच्याजवळ आहेत, ती वारंवार वाचत रहा आणि उजळणी करत राहा. पुढे स्वतःचीच टेस्ट घ्या. यामुळे तुम्हाला माहिती होतं, की तुम्हाला कोणत्या विषयात सुधारण करणं गरजेचं आहे, असं तिनं म्हटलं.

वेळेचे व्यवस्थापन आणि नियोजन –
ती म्हणते, की तुम्ही कितीही सराव करा, परंतु उत्तर लिहिण्याचा सराव केला नाही तर सगळी मेहनत व्यर्थ आहे. त्यामुळं, जेव्हा तुमच्याकडे एवढी माहिती जमा झाली असले, ज्यानं तुम्ही उत्तराच्या सरावासाठी सुरूवात करू शकता, तेव्हापासून उत्तर लिहिण्याचा सराव करा. सुरूवातीला ती उत्तर चांगली लिहिता येणार नाहीत. मात्र, घाबरू नका. ती चांगली लिहिता यावी यासाठीच आपण हा सराव करत असल्याचं सिमीनं म्हटलं. यात आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करणं होय. तसेच क्लासच्या वेळी ब्रेक मिळाला की अभ्यास करणं. पार्टी फेअरवेल अशा गोष्टी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणं, ई नोट्स सोबत ठेवणं, जेणेकरून वेळ मिळताच त्या वाचता याव्या. अशा अनेक गोष्टी करत सिमीनं सिद्ध केलं, की नियोजन आणि ध्येय निश्चित असेल तर अवघडात अवघड ध्येयही गाठलं जाऊ शकतं. असे सिमीनं आपल्या याच यशाचा मंत्र यूपीएससी करणाऱ्या इतरांनाही सांगितला आहे.