लघवीची ‘ही’ समस्या महिलांना जास्त जाणवते, ही आहेत 6 कारणे, जाणून घ्या

पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. पावसाळ्यात महिलांना वारंवार लघवीला होण्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते, तसेच काही प्रमाणात पुरूषांनाही ती जाणवते. पावसाळा आणि हिवाळ अशा दोन्ही ऋतूमध्ये ही समस्या जाणवते. अनेकदा पाण्याचं सेवन कमी केलं तरी सुद्धा वारंवार लघवीला जावे लागते. असे का होते ते जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे

1 थंड वातावरणात रक्तवाहिन्यांवर सुद्धा प्रभाव पडत असतो. त्यामुळे दबाव वाढल्याने बदल होत असतात. याचा परीणाम किडनीवर होतो.

2 किडनीला अधिक काम करावं लागतं. ज्यामुळे युरीन जमा होण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून या काळात लघवी जास्त लागते.

3 पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात बदल झाल्यामुळे जास्त लघवी येते.
काही नैसर्गिक घटकांचा परीणाम शरीरावर होत असतो.

4 ही एका प्रकारची मानसीक स्थीती आहे. ज्यामुळे लघवी अनेकदा येते. तज्ञांच्यामते जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही.

5 शरीरातील तापमान कमी होत असतं. त्यामुळे हात कापायला लागतात. तसंच शरीर गारठतं. सतत लघवी होत असल्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होत असते.

6 थंड वातावरणात जास्त लघवी येणे. हे हाइपोथर्मिया असल्याचं लक्षण असू शकतं. शरीर थरथरणे, श्वास घेण्यासाठी त्रास, ही याची लक्षणं आहेत. थंड हवामानात सतत लघवीसह आणखी त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.