वैवाहिक जीवन कसे सुखी करावे ? जाणून घ्या ‘हे’ 5 सल्ले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वैवाहिक संबंध यशस्वी करणे सोपे काम नाही. रिलेशनशिप एक्सपर्ट्स म्हणतात की, नात्याला सुखी ठेवण्यासाठी बर्‍याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांच्या भावना समजून घेणे.

प्रत्येक विवाहित जीवनात लहान लहान समस्या येत असतात, परंतु जर वेळेत त्या गोष्टी सोडवल्या तर त्या गोष्टी मोठ्या होत नाहीत. बरेच लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उघडपणे बोलण्यापासून परावृत्त असतात. या अडचणींवर मात करण्यासाठी, रिलेशनशिप एक्सपर्ट्सचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. जाणून घेऊया…

१) नेहमीच बोलणे सुरू ठेवा

कोणतीही समस्या दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे संवाद. आपण आपल्या जोडीदारासोबत कोणत्याही विषयावर उघडपणे बोलले नाही, तर ही समस्या कधीही सुटणार नाही. केवळ बोलण्याद्वारे आपण जोडीदाराच्या भावना समजून घेऊ शकता आणि आपल्या भावना स्पष्टपणे सांगू शकता. जेव्हा आपापसात बोलणे थांबवले जाते तेव्हा नात्यात अडचण निर्माण होते.

२) एखादा मुद्दा मोठा बनवू नका

एकमेकांमध्ये भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. सुखी नात्यासाठीदेखील भांडण आवश्यक आहे, परंतु त्याच विषयावर वारंवार भांडण केल्याने हे प्रकरण मोठे होते आणि नंतर नात्यात अंतर येऊ लागते. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या दोघांचे मत भिन्न असू शकते. जोडीदाराच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.

३) घरगुती कामे एकत्र करा

कपडे धुणे, भांडी किंवा साफसफाई करणे यांसारख्या कामात आपल्या जोडीदाराला मदत करा. जेव्हा आपण दोघे घरी असता तेव्हा आपले काम मिळून करा. त्यामुळे एखाद्यावर जास्त काम पडणार नाही आणि आपणहून दोघे एकमेकांच्या जवळ येतील.

४) एकमेकांचे कौतुक करा

प्रत्येकजण आपल्या जोडीदाराने आपले कौतुक करावे अशी अपेक्षा करतो. एकमेकांचे कौतुक करून, आपण दोघेही नेहमी सकारात्मक असाल. यामुळे छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचीही सवय लागेल.

५) एकमेकांना प्राधान्य द्या –

जोडीदाराकडून केवळ आपल्या अपेक्षा ठेवू नका, तर त्यास स्वत:ला जेवढे प्राधान्य द्याल तितके त्यांना द्या. विचार सारखे नसतील परंतु भिन्न मतांचा आदर करणेदेखील महत्त्वाचे आहे.