Jio करणार मोठा धमाका, आता स्मार्टफोन फक्त 3 हजारांत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पावधीतच टेलकॉम क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या रिलायन्स जीओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवी योज़ना आणण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच २ ते ३ हजार रूपये किमतीचा ४जी स्मार्ट फोन लॉन्च करणार आहे. जीओचा हा फोन आल्यास जे ग्राहक २ जी वापरत आहेत. त्यांना ४ जी सर्विसमध्ये येण्यासाठी सुवर्णसंधी आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार जिओ लवकरच ही गुड न्युज ग्राहकांना देणार आहे.

जिओचे ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य

जिओची सध्या सब्सक्राइबर्सची संख्या जवळपास ३७.५ कोटी आहे. जिओचे सब्सक्राइबर्स आकडेवारी ५० कोटी पर्यंत पोहोचण्यासाठी जिओने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टसमध्ये झालेल्या वार्षिक सभेत कंपनीने हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. ५० कोटी आकडेवारी गाठण्यासाठी जिओ स्वस्तातील ४ जी स्मार्टफोन आणणार आहे.

२ जी युजर्सला ४ जी वर शिफ्ट करण्याचे प्रयत्न

सध्या दुसऱ्या कंपन्यांच्या नेटवर्कवर ५० कोटीहून अधिक २ जी युजर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी जिओने टार्गेट ठेवले आहे. भारतात सध्या 4G LTE स्मार्टफोन्सची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे २ जी युजर्स ४ जी वर अपग्रेड करू शकत नाही. २ जी युजर्सला ४ जी वर शिफ्ट करण्यासाठी २ हजार ते ३ हजार रुपये दरम्यान ४ जी स्मार्टफोन्सची गरज लागणार आहे.

जिओचा स्वस्तातील 4G LTE स्मार्टफोन्स चांगला असण्याची शक्यता आहे. भारतात मोबाइल युजर्सची संख्या जवळपास १०० कोटी आहे. यात ५५ कोटी युजर्स २जी किंवा ३जी नेटवर्कमधील आहेत. जिओ युजर्सला आधीपासूनच ४ जी सेवा देते. कंपनीने २०१७ मध्ये पहिल्यांदा युजर्संना केवळ दीड हजार रुपये किंमतीचा ४ जी फीचर स्मार्टफोन लाँच केला होता. जिओचा हा फोन अनेकांच्या पसंतीस पडला होता.