देशात ‘मोदी अ‍ॅक्ट’ आला का? नवाब मलिकांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेमडेसिवीर तुटवड्याच्या मुद्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला मलिक यांनी आज (मंगळवार) सडेतोड उत्तर दिले आहे. देशात नवा मोदी अ‍ॅक्ट वगैरे आलाय की काय ?, असा रोखठोक सवाल मलिक यांनी केला आहे. मलिक माध्यमांशी बोलत होते.

मलिक म्हणाले, देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण काही पक्षांना राजकारण करण्याशिवाय काहीच काम नाही. महाराष्ट्रात भाजपकडून अपप्रचार केला जात आहे. देशातील सात रेमडेसिवीर कंपन्यांना केंद्राने परवानगी दिली आहे. दुसरीकडे रुग्णांचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर भेटत नसल्याचे चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे सुरतच्या भाजप कार्यालयात रेमडेसिवीर वाटलं जात होतं. यावर आम्ही प्रश्न उपस्थित केल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला की, याबाबत आम्हाला काही माहिती नाही, असे मलिक यांनी सांगितले.

भाजपचे काही नेते रेमडेसिवीर इंजेक्शनचे 50 हजार वाईल्स महाराष्ट्र सरकारला आणून देऊ, असा दावा करत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाउनमध्ये उपलब्ध झाला होता. ते चालवणारे एक भाजपचे नेते आहेत. जळगाव-अमळनेर येथून अपक्ष निवडून आले आणि 2009 च्या निवडणुकीत भाजपकडून पराभूत झाले होते. नंदूरबारमधील हिरा एक्झिक्युटिव्हने हजारो रेमडेसिवीरचा साठा करुन ठेवला होता. त्यांनी आठ तारखेला लोकांना वाटप केला. वीकेंड लॉकडाऊननंतर 12 एप्रिलला पुन्हा वापट केले. ब्रुक फार्माचे 20 हजार पेक्षा जास्त रेमडेसिवीर वाईल्स आणून ठेवली होती. हे करण्यासाठी शिरीष चौधरी आणि त्यांच्या स्टाफकडे एफडीएचा कोणता परवाना होता का ? बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर आणतात आणि वाटतात. तिच व्यक्ती प्रविण दरेकरांना घेऊन राजेंद्र शिंगणे यांना भटले होते. याप्रकरणी नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

ब्रुक फार्माला महाराष्ट्रात एफडीएने पत्र दिलं होतं. त्यावर दमणच्या एफडीएने रेमडेसिवीर देता येणार नाही, असे सांगितले. म्हणून मी मुद्दा उपस्थित केला होता की, केंद्राकडून अडवणूक होत आहे. मग केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीच चर्चा केली. आता ब्रुक फार्माच्या मालकाला वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री वकीलपत्र घत आहेत.

माझ्या जावयाचा प्रश्नच नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. जावयाच्या सुटकेसाठी मी बोलत नाही. पण कालपासून काहीजण माझ्याकडे बोट दाखवत आहेत. क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगतोय की, किती कारभार पारदर्शी चालतो लवकर दखवेल. माझा राजीनामा मागत आहेत. राज्यापलांकडे जात आहेत, मी त्यांना विचारतोय की देशात कुठला मोदी कायदा आलाय का ? त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यपालांना दिले आहेत क ?मग त्याची माहिती आम्हालाही कळू द्या. काळा बाजार आणि साठा करणाऱ्यांना भाजप का वाचवत आहे ? असा सवाल मलिक यांनी केला.