कलम ३७० बाबत अभिनेते अनुपम खेर यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

कानपूर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या समस्यांवर उपाय म्हणजे कलम ३७० हटवणं असं विधान अभिनेते आणि भाजप समर्थक अनुपम खेर यांनी विधान केलं आहे. रविवारी कानपूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते.

विरोधकांनी आता घाबरलं पाहिजे-

अनुपम खेर म्हणाले की , ‘निवडणुकीत जनतेने घराणेशाहीला नाकारत मोदींना मतदान केलं आहे. लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे संपूर्ण देश असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आपण ज्या लोकशाहीचा उत्सव साजरा केला आहे तसेच आता आपण सरकारला साथ देत देशाच्या पाठिंब्यासाठी सहकार्य करु . नरेंद्र मोदी आणि सरकारच्या मागे संपूर्ण देश असल्याचं म्हणतं विरोधकांनी आता घाबरलं पाहिजे. विरोधकांनीसुद्धा असे काहीतरी केलं पाहिजे की त्यांनासुद्धा लाखो लोक पाठिंबा देतील.’

राजकारणात येण्याचा तूर्तास निर्णय नाही –

मला राजकारणात जाण्याची अद्याप गरज वाटतं नाही आणि जेव्हा मी राजकारणात येईन तेव्हा प्रथम मी माध्यमांशी येऊन संवाद साधून याची माहिती देईन. माझी पत्नी खासदार असून कुटुंबातील एक सभासद राजकारणात असल्याचं पुरेसे आहे. असेही अनुपम खेर म्हणाले.

कलम ३७० –

या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देताना काही तरतुदी केल्या होत्या. राज्यात कोणताही कायदा लागू करण्याआधी केंद्र सरकारला राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व तसेच राज्याच्या घटनेला बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. राज्यात आणीबाणी लागू करता येत नाही, अशी तरतुदी आहेत.