चक्क नदी चोरीला गेल्याची तक्रार

कोल्हापूर :पोलीसनामा ऑनलाईन

शिल्पा माजगावकर

कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार आज हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दिलीय. तक्रारीचा विषय पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यातील कर्मचारी आवक झाले. 100 हुन अधिक ग्रामस्थ पॊहण्याचे साहित्य , मच्छीमारी ची जाळी, मच्छी मारीची डालगी घेऊन थेट पोलीस ठाण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला.

हातामध्ये मासे पकडण्याची जाळी घेऊन , डालगी घेऊन हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झालेले हे आहेत हे आहेत हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थ . त्यांच्या गावा शेजारी असणारी पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात आलेले आहेत. पंचगंगा नदी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी हिरव गवत उगवलं असून पाण्याने भरलेली आपली पंचगंगा चोरीला गेली आहे असं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात नदी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली . या तक्रारीचा विषय पाहून सुरुवातीला पोलिसांही अवाक झाले. त्या नंतर हि तक्रार दाखल होत नसल्याचे सांगताच ग्रामस्थ आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. दोन तासाचा आंदोलना नंतर पोलिसांनी त्याचा तक्रार अर्ज स्वीकारला यावेळी आमची नदी ज्यांनी चोरली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आमची नदी आम्हाला परत करावी अशी मागणी केली.

पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार जरी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली असली तरी या ग्रामस्थांच्या मागणी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोल्हापूरची पंचगंगाप्रदूषित झाली आहे. पाण्याच्या जागेवर कित्तेक किलोमीटर वर जलपर्णी चा विळखा झाला आहे. आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सुस्त बसून आहे. झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज हातकणंगले ग्रामस्थांना पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार द्यावी लागते हि दुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल.