Republic Day 2020 : तिरंग्याबद्दलच्या ‘या’ 6 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज संपूर्ण भारतात ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. आपल्या देशाची एकता, अखंडता आणि ओळख आपला तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला? आणि त्या मागचा विचार काय होता? हे जाणून घेऊया…

१९०६ मध्ये भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार करण्यात आला होता, जो कोलकता येथील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला. केसरी, पिवळा आणि हिरवा रंग असलेल्या या ध्वजात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिलेले  होते. दरम्यान, याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता. तो ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. जो केवळ दोन रंगांचा होता.  त्यांनतर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता, जो तीनसाज रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते.

याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर डॉ.एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या आणि तारेही होते. हा ध्वज एका आंदोलनादरम्यान तयार केला होता.

त्यांनतर १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी ध्वजाचा विषय काढल्यानंतर पिंगली वैंकय्या यांनी ध्वज तयार केला होता. त्यात केवळ लाल आणि हिरवा असल्याने त्यामध्ये पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. हा ध्वज आधी अखिल भारतीय कॉंग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज १९३१ मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. यांनतर अखेर २२ जुलै १९४७ रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला गेला. ध्वजातील रंगांचा अर्थ भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. तर, हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.

राष्ट्रध्वजासंबंधी भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.
१) सरकारी नियमानुसार राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा.
२) या राष्ट्रध्वजाची लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे असणे अनिवार्य आहे.
३) राष्ट्रध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा उच्च स्थानावरून फडकविला जावा
४) केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो
५) शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा, तसेच सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.
६) महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.