‘आर्ची आलीय… आर्ची…..’ म्हटल्यावर ‘रिंकु’च्या सेटवर गोळा झालं अख्ख गाव, पुढं झालं ‘असं’ काही
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी अभिनेत्री रिंकु राजगुरू सध्या आपल्या मेकअप या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. मेकअप सिनेमाची शुटींग सुरू असताना रिंकुला शुटींगवेळी गर्दीचा चांगलाच अनुभव आला. रिंकुचं शुटींग सुरू आहे हे पाहून एवढी गर्दी जमा झाली की, शुटींग करणंही अवघड झालं होतं.
https://www.instagram.com/p/B8BAmEapNaJ/?utm_source=ig_embed
पुण्यातील खराडी गावात मेकअप सिनेमाचं शुटींग होणार होतं. रिंकु येणार आहे हे ऐकूण अख्ख गाव सेटवर आलं होतं. लोकांची एवढी गर्दी सेटवर जमा झाली होती की, अक्षरश: सिनेमाचं शुटींग रद्द करावं लागलं. रिंकुला पाहण्यासाठी गर्दी जमा होण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. रिंकु एखाद्या ठिकाणी येत आहे हे पाहून लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते.
आपला अनुभव सांगताना दिग्दर्शक गणेश पंडित म्हणाले, “रिंकु आली हे ऐकून गावात मोठी गर्दी जमा झाली होती. तिला पाहण्यासाठी चढाओढ सुरू झाली. रिंकुसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती. आम्ही शुटींगला सुरुवात करू शकलोच नाही. सगळाच गोंधळ सुरू होता. आम्ही गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात आम्हाला यश काही आलंच नाही. आम्ही शुटींग कॅन्सल केलं आणि रिंकुला घेऊन हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला. तिथेही काही वेगळी परिस्थिती नव्हती.”
https://www.instagram.com/p/B7vbAZTJSeq/?utm_source=ig_embed
सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर रिंकुचा मेकअप हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात रिंकु एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. सिनेमात तिच्यासोबत चिन्मय उद्गीरकर, प्रतिक्ष लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.