रायगडच्या मेघडंबरीत बसून फोटो काढल्याने अभिनेता रितेश देशमुख याने अखेर माफीनामा जाहीर केला आहे. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता केवळ भक्तिभावातून आम्ही हे फोटो काढले होते, पण जर कोणाची माने दुखावली गेली असतील तर मी अंतःकरणापासून माफी मागतो. असं तो म्हणाला.
काही दिवसापूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव पानिपतकार लेखक विश्वास पाटील हे आपल्या मित्रांसोबत ५ जुलैला रायगडावर फिरायला गेले होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रायगडच्या मेघडंबरीत बसून फोटो काढले आणि ते फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर ही केले होते. त्यामुळे त्यांना चौफेर टीकेचा सामना करावा लागला होता. अनेकांनी रितेश देशमुख यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f348e46c-80fa-11e8-9613-c77335da40e5′]