अखेर रितेशचा माफीनामा जाहीर 

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

रायगडच्या मेघडंबरीत बसून फोटो  काढल्याने अभिनेता रितेश देशमुख याने अखेर माफीनामा जाहीर केला आहे. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता केवळ  भक्तिभावातून आम्ही हे फोटो काढले होते, पण जर कोणाची माने दुखावली गेली असतील  तर मी अंतःकरणापासून माफी मागतो. असं तो म्हणाला.

काही दिवसापूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव पानिपतकार लेखक विश्वास पाटील  हे आपल्या  मित्रांसोबत ५ जुलैला रायगडावर  फिरायला गेले होते.  त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रायगडच्या  मेघडंबरीत बसून फोटो  काढले आणि ते फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर ही केले होते. त्यामुळे त्यांना चौफेर  टीकेचा सामना करावा लागला होता. अनेकांनी रितेश देशमुख यांच्यावर शिव्यांची लाखोली  वाहिली  होती.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f348e46c-80fa-11e8-9613-c77335da40e5′]

रितेश देशमुख म्हणाला कि;  “आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी  महाराजांच्या व्यक्ति महत्वापासून प्रेरणा घेण्यासाठी आम्ही नुकतच रायगडावरून आलो आहे.  सर्व शिवभक्तांनप्रमाणे मी  तिथल्या  वातावरणाने भारून गेलो होतो. त्याच्या पुतळ्याला हार घालून आम्ही नतमस्तक झालो.  खूप दिवसांपासून रायगडावर त्याच्या पायाशी कृतज्ञ  होण्याची इच्छा होती.तिथे बसून आम्ही काही फोटो घेतले. आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले.  यामागे फक्त भक्तिभाव होता. यातून कोणाला दुखवण्याचा  हेतू अजिबात नव्हता. पण जर आमच्या कृत्यामुळे कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर  त्यांची मी अंतःकरणपूर्व  माफी मागतो.