‘मोदींनी एकदाही तलाक न म्हणता पत्नीला सोडून दिलं’ : अजित सिंहाचा घणाघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक जवळ येत आहे तशी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. पातळी ओलांडून एकमेकांवर आरोप होताना दिसत आहे. राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. मोदींचा एकेरी उल्लेख त्यांनी केला आहे. ‘तीन तलाक.. तीन तलाख….परंतु स्वत:च्या पत्नीला एकदाही तलाक न बोलताच मोदींनी सोडून दिले.’ असे म्हणत मोदींवर घणाघाती  टीका केली आहे.

एका सभेत बोलताना मोदींवर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख करत अजित सिंह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच खोट बोलत नाहीत, फक्त आजपर्यंत त्यांनी कधीच खरे बोललं नाही. लहान मुलांना ते शिकवतात की, खरे बोला, परंतु त्यांच्या आई-वडिलांनीच त्यांना खरे बोलायला शिकवले नाही. मोदी नेहमीच मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे राहतात. तीन तलाक.. तीन तलाक.. असे म्हणत तिहेरी तलाकंच बोलत असतात परंतु स्वत:च्या पत्नीला मात्र त्यांनी एकदाही तलाक न बोलताच सोडून दिले. “असे म्हणत मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

निवडणुका जवळ आल्या की, एकमेकांवर टीका करताना राजकीय  नेते एकमेकांवर अगदी तुटून पडतात. टीका करताना त्यांची जीभ घसल्याचे दिसून येते. कधी कधी तर काही नेते पातळी ओलांडून खालच्या भाषेत टीका करतात. इतकेच नाही तर बऱ्याचदा ते एकमेकांच्या खासगी आयुष्यावरही टीका करतात आणि नंतर मग केलेल्या वक्तव्याचा पश्चत्ताप करत माफी मागतात.