औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोडीच्या गुन्ह्यात लुटलेल्या पैशांच्या वाटणीवरून चोरट्यांमध्ये वाद होऊन एकाचा चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सूतगिरणी चौकातील गुरुकृपा फरसाण मार्ट रविवारी रात्री फोडून 9 हजार 500 रुपयांची रोकड चोरली.
चोरलेल्या रकमेच्या वाटणीवरून त्यांच्यामध्ये वाद झाले याच वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात ही घटना सूतगिरणीच्या मैदानावर घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे तर त्यांचे इतर दोन साथिदार फरार झाले आहेत. या घटनेत एक सराईत चोरटा गंभीर जखमी झाला असून आरोपींवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जनार्दन येडे (वय-21 रा. इंदिरानगर), इम्रान बेग आमीर बेग (वय-25 रा. काबरानगर) या दोघांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांनी रेकॉर्डवरील आरोपी शेख माजीद गुलाब शेख (वय-18 रा. काबरानगर) याचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला. शेख माजीद याच्यावर घरफोडीचे जवळपास 15 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांनी गुरुकृपा फरसाण मार्ट फोडले. दुकान फोडल्यानंतर ते वाटण्या करण्यासाठी जवळच्या सूतगिरणीच्या मैदानात गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी माजीदचा गळा चिरला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे, हवालदार बोरडे करीत आहेत.
Visit : Policenama.com
- भिजवलेले बदाम नियमित सेवन केल्यास होतील ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे
- लग्न करण्याचेही ‘हे’ 5 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या
- नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- नेहमी ताजेतवाने, उत्साहित राहण्यासाठी ‘या’ 9 गोष्टींची काळजी घ्या
- निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या
- मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या