नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील खरगोन पोलिसांनी दरोडेखोर वधू टोळीच्या तीन आरोपींना अटक केली आहे. सोबतच आरोपींकडून 25 हजारांची रोकड जप्त केली आहे. त्याचवेळी, दरोडेखोर वधूसह एक महिला फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना मध्य प्रदेशातील कसरावद पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जेथे विकी नावाच्या व्यक्तीने आरती वर्मा नावाच्या मुलीशी लग्न केले होते. नवरदेवाच्या घरच्यांनी आरोप केला आहे की, मुलीच्या घरच्यांनी 1 लाख रुपये घेऊन विवाह केला आहे.
यानंतर लग्नाच्या रात्री आरतीने तिच्या सासरकडच्यांची फसवणूक करत घरातून बाहेर पडत आपल्या सोबतीसोबत पळून गेली. जेव्हा विकी आणि त्याच्या कुटुंबियांना या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. यानंतर पीडित कुटुंबीयांनी कुटुंब तक्रार नोंदवण्यासाठी कासरावड पोलिस स्टेशन गाठले. आरती नावाच्या मुलीशी लग्न करून आपली फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कसरावड पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय द्विवेदी यांनी सांगितले की, ‘विकी आणि त्याचे वडील राजाराम आर्य यांनी 9 फेब्रुवारी रोजी अहवाल दाखल केला होता. ते म्हणाले की, शेगाव येथील रहिवासी महिलेने त्याचे एक लाख रुपये घेऊन लग्न केले होते. त्यानंतर पहिल्याच दिवशी वधू तिच्या साथीदारांसह फरार झाली. द्विवेदी पुढे म्हणाले की, ’12 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात दोन आरोपी आधीच पकडले गेले होते. नंतर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 25000 रुपये जप्त केले आहेत. त्यांनी सांगितले की हे लोक गरजू लोकांना अडकवून बनावट विवाह करतात आणि वधूबरोबर तेही रक्कम घेऊन पळून जातात. सध्या आरोपी वधू आणि आणखी एक महिला फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी कारवाई करत संतोष नागराज आणि राकेश भिल या दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या हे दोन्ही आरोपी तुरूंगात आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी स्टेशन प्रभारी संजय द्विवेदी यांनी पथक तैनात केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान यादव, राजू आणि सूरज या तीन आरोपींना 11 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. लवकरच सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल.