आमंत्रणाची परतफेड म्हणून भारतरत्न
२०१८ साली प्रणव मुखर्जी यांना संघाच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. तेव्हा प्रणव मुखर्जींनी संघाचे निमंत्रण स्वीकारून संघाच्या व्यासपीठावरून भाषणही केलं होतं. संघाचं हे आमंत्रण स्वीकारल्याची परतफेड म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ देण्यात आलं आहे, असं आझम खान यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘संघानं मुखर्जींना कार्यक्रमाला बोलावलं. मुखर्जींनी काँग्रेसचे असूनही ते आमंत्रण स्वीकारलं. या बदल्यात त्यांना काहीतरी देणं भाग होतं. म्हणूनच संघानं त्यांना ‘भारतरत्न’ देऊन टाकलं’. असा आरोप आझम खान यांनी केला आहे.
पाय पसरण्यापुरवी खात्री करा… घसरून पडाल
प्रणव मुखर्जींना ‘भारतरत्न’ देऊन भाजप पश्चिम बंगालमध्ये पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी पाय जरूर पसरावे, पण त्याआधी जमिनीवर अॅसिड तर नाही ना, याची खात्री करावी अन्यथा घसरून पडण्याची शक्यता जास्त असते, असा टोलाही आझम खान यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना हाणला.