‘आरक्षणा’च्या मुद्यावर ‘चर्चा’ होणे आवश्यक : मोहन भागवत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबदद्ल आपली भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्या दरम्यान सुसंवाद झाला पाहिजे. या आधी देखील आपण आरक्षणासंबंधित भूमिका स्पष्ट केली होती मात्र त्यावरुन तेव्हा गोंधळ झाला होता आणि विषय मूळ मुद्यापासून भरकटला होता अशी आठवण देखील भागवत यांनी दिल्लीतील कार्यक्रमात करुन दिली.

आरक्षणाच्या मुद्यावर सुसंवाद आवश्यक
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना भागवत म्हणाले की, आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन आपली मते मांडावीत तसेच विरोध करणाऱ्यांनी समर्थन करणाऱ्यांची बाजू ऐकून घ्यावी. आरक्षणावर बोलताना अनेकदा टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात, मात्र यावर समाजातील वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे विचार आहेत. यावर सुसंवाद व्हायला हवा. यावेळी ते स्पर्धा परिक्षेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

2015 साली बिहारच्या विधानसभेवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांना एका साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत म्हणले होती की, घटनेतील कलमामुळे आरक्षणाचा राजकीय हितासाठी उपयोग करण्यात आला. आमचे म्हणणे आहे की एक समिती बनली पाहिजे. ज्यात राजकीय प्रतिनिधी असेल; परंतु जे सेवाभावी असतील व ज्यांच्या मनात देशहित असेल अशांचेच महत्त्व असावे. त्यांना ठरवू द्या की किती दिवस, कुणाला आरक्षण द्यावे. याचे सर्वाधिकार या समितीला असतील.

भागवत यांच्या या विधानामुळे अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या, बिहार निवडणूकी दरम्यान दिलेल्या या विधानामुळे अनेकांनी भागवतांवर टीका केली होती.

आरोग्यविषयक वृत्त-