नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी संघावर तीव्र शब्दात निशाणा साधला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS )ही भारतातील दहशतवादी संघटना असून यासंबंधित पुरावेही आपल्याकडे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. काल प्रजासत्ताक दिनी कर्नाटकात आयोजित एका सभेमध्ये बोलत होते.
#WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar's great-grandson, in K'taka: …I'd said RSS is India's terrorist org,get it banned…A sadhvi sits beside PM&says that when Indian Army exhausted its arms&ammunition,RSS provided them that. How did RSS get that arms&ammunition?…(26.01) pic.twitter.com/PMmtLX2afc
— ANI (@ANI) January 27, 2020
यावेळी राजरत्न यांनी पाकिस्तानमध्ये केलेल्या भाषणाचा हवाला देत म्हटले की, आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणली पाहिजे. माझ्याकडे यासंबंधीत सर्व पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुला साध्वी बसलेली आहे. ती मुलाखतीत सांगते की, जेव्हा भारतीय सैन्याकडील दारुगोळा, बंदुका संपल्या, तेव्हा आरएसएसने त्यांना ती पुरविली. मग आरएसएसकडे एवढे बॉम्ब कसे आणि कुठून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका कुठून आल्या,असा सवाल त्यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले कि, पंतप्रधानांच्या बाजुला बसलेली साध्वी अशा प्रकारचे विधान करते. ज्या घरात बॉम्ब सापडतो ते घर आणि त्या घरातील मुलगा दहशतवादी ठरत नाही का. मग जर या संघटनेकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा किंवा शस्त्रसाठा असेल तर ही संघटना दहशतवादी होत नाही का ? असा आरोप राजरत्न यांनी केला. तसेच या संघटनेचे लोक आज अनेक दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत. त्यामुळे या संघटनेवर जागतिक बंदी आणण्याची गरज आहे. ते काम आम्ही करत आहोत, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
- फेसबुक पेज लाईक करा –
- वाढत्या वयात महिलांना होतात ‘या’ 6 समस्या ; असा करा बचाव !
- ‘ब्रेन स्ट्रोक’ टाळण्यासाठी करा ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या 12 लक्षणे
- ‘बॉडी डिटॉक्स’ म्हणजे काय ? बिघडले तर ‘हे’ 5 परिणाम होतात शरीरावर
- काय आहे ‘हर्निया’ आजार ? या 8 पद्धतीने घ्या काळजी
- भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर !
- ALERT थंडीत वाढते वजन ! ‘या’ 6 उपायांनी ठेवा नियंत्रणात, ‘ही’ आहेत 5 कारणे