Rushabh Shetty | ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीचे बॉलीवूडबद्दल मोठे विधान; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन : Rushabh Shetty | सध्या ‘कांतारा’ चित्रपटाने (kantara Movie) सर्वत्र आपली छाप सोडली आहे. यावर्षी दाक्षिणात्य चित्रपट हे यंदाच्या बॉलीवूडवर (Bollywood) भारी ठरले असे म्हणण्यात काही चुकीचं नाही. सध्या बॉलीवूडचा काळ थोडासा कठीणच म्हणावा लागेल. यंदाच्या वर्षी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज चव्हाण’ असो किंवा आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्डा’ असे अनेक बिग बजेट चित्रपट लोकांच्या मनात राज्य करू शकले नाही. याउलट दाक्षिणात्य चित्रपटांनी मात्र बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच डंका वाजवला आहे. त्यात अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ असो किंवा यशचा (Yash) ‘केजीएफ-2’ चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात जणू घरच केले आहे. आता चर्चेत असलेला कन्नड चित्रपट ‘कांतारा’ ला सुद्धा प्रेक्षकांना चित्रपट गृहामध्ये खेचून आणण्यात यश आले आहे. आता या चित्रपटातील अभिनेता ऋषभ शेट्टीने (Rushabh Shetty) बॉलीवूड बाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

एका मुलाखती दरम्यान ऋषभ शेट्टीने बॉलीवूड बाबत त्याचे मत स्पष्ट केले आहे. यावेळी अभिनेता ऋषभ शेट्टी म्हणाला, “बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांमध्ये पाश्चात्यांचा चांगलाच प्रभाव आहे. याच्या नादात ते प्रेक्षकांना नक्की काय पाहण्यास आवडते याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आम्ही प्रेक्षकांना जे आवडते ते लक्षात ठेवून चित्रपट बनवतो. आम्ही चित्रपट स्वतःसाठी नाही बनवत. चित्रपट बनवताना आपण प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे. पाश्चात्य देशातील चित्रपट निर्माते हे विविध सामग्रीचा वापर करून चित्रपट बनवतात. त्याचाच वापर भारतातील चित्रपट निर्माते ही करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्ही असा का करत आहात? हॉलीवुड (Hollywood) मध्ये हे लोकांना आधीच मिळत आहे. त्यांचे कथा दिग्दर्शन कथाकथन कामगिरी ही खूप चांगली आहे”.

ऋषभ शेट्टीने (Rushabh Shetty) पुढे बोलताना सल्ला देखील दिला आहे की,”OTT प्लॅटफॉर्मवर
बऱ्याच भाषांमध्ये विविध कंटेंट पाहायला मिळतात. पण माझ्या सिनेमाची कथा ही माझ्या गावाची कथा आहे.
जी तुम्हाला देशात कुठेही मिळणार नाही. तुमच्या प्रदेशात अनेक कथा असतात तुम्ही कथाकार आहात त्या कथा
तुम्हाला लोकांपर्यंत आणण्याची गरज आहे”. असे मत ऋषभनी यावेळी व्यक्त केले.

Web Title :- Rushabh Shetty | kantara fame rishab shetty made a big statement about bollywood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Sharad Ponkshe | शरद पोंक्षेची टिकली प्रकरणावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले….

Andheri Bypoll Result | भाजपच्या मदतीने ऋतुजा लटके विजयी, अन्यथा…, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया