कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांना कीटकनाशक सुरक्षित वापर व कापूस पिकावरील बोंड अळी व्यवस्थापन याची जनजागृती करण्यासाठी जनजागृतीच्या रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांचे हस्ते करण्यात आले. सदर जनजागृती रथ कळंब तालुक्यात आठ जिल्हा परिषद मतदार संघात प्रचार करणार आहे .
उद्घाटन प्रसंगी तहसिलदार मंजुषा लटपटे, तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, पंचायत समिती कृषी अधिकारी विरेश अंधारी, मंगेश चव्हाण, विस्तार अधिकारी (कृषी) मोहन बंडगर, श्रिनिवास शिंदे तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृषी पंचायत समिती, कळंब, तालुका कृषी अधिकारी कळंब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उस्मानाबादचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमनशेटे यांनी मार्गदर्शन केले आहे .
सदर कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षा कीट वापरायची जनजागृती होणार आहे. तसेच विविध पिकाचे कीड व रोगाच्या नियंत्रणाची माहीती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा
- मानसिक ताण दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय, करा ‘हा’ खास व्यायाम
- बैठे काम करणाऱ्यांनी अवश्य करावे ‘भुजंगासन’, दूर होईल पाठदुखी
- त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी करा ‘हलासन’, इतरही आहेत खास फायदे
- पॉवर, हॉट, अष्टांग योग माहित आहे का? जाणून घ्या ‘मॉडर्न योग’बाबत
- पावसाळ्यात १ कप ‘लवंग चहा’ तुम्हाला ठेवतो निरोगी, होतील ‘हे’ ६ फायदे
- ‘डाळिंबाच्या सालीचा चहा’ पिऊन बघाच! ‘हे’ आहेत ६ आरोग्यदायी फायदे
- पोटाची चरबी कमी करायची आहे? करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा