भरदिवसा पिंपरीत सेल्समनचा कोयत्याने सपासप वार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

सेल्समनचे काम करणाऱ्या एकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अंजठानगर येथे घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1efbcd89-c899-11e8-956a-f5c91ea85ccd’]

नंदू चव्हाण (३९, रा. सांगवी) याचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू हा सेल्समनचे काम करतो. आज दुपारी तो जेवण करून बाहेर गेला होता. अंजठानगरमध्ये जाणाऱ्या आतल्या रस्त्यावर एक टपरी आहे. त्या ठिकाणी तो सिगारेट ओढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर मारेकरी फरार झाले.

[amazon_link asins=’B00PQKR85E,B00VT8CUHS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64f29be1-c89a-11e8-ae96-7100f0c5eb6a’]
नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. निगडी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंदूला दवाखान्यात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खुनाचे कारण आणि कोणी केले हे अद्याप समजले नाही. निगडी पोलीस आणि गुन्हे शाखा मागावर आहेत. नंदू हे सेल्समनचे काम करतात आणि सांगवी मध्ये राहतात. नंदू यांचे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध होते. कोणाशीही भांडण नव्हते. तरीही त्यांच्या भरदिवसा खून करण्यात आला.
वर्दळीच्या ठिकाणी दुचाकिवर येऊन खून केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा खून झाला असून अद्याप तपासाच्या दृष्टीने काहीच धागेदोरे मिळू शकत नाही. जुन्या भांडणातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. तर यामध्ये सराईत गुन्हेगार असावेत असे बोलले जात आहेत. तपास पोलीस करत आहेत.

साथीच्या आजाराचे शहरात थैमान; पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिका गांभीर्याने पहात नाही. शहारात सर्वत्र अस्वच्छता आहे. पावसाचे पाणी साचुन तयार झालेल्या डबक्यांमध्ये डासांची निर्मिती होत आहे. त्यासाठी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी मागणी काल दि. ४ ऑक्टोंबर रोजी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांना भेटून केली. त्यांच्या समवेत आमदार गौतम चाबुकस्वार, वैद्यकीय अरोग्य अधिकारी रॉय, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महिलासंघटीका उर्मीला काळभोर, अनंत कोऱ्हाळे, अनिता तुतारे, सरिता साने उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले शहरात स्वाईन फल्युने कहर माजविला आहे. स्वाईन फ्ल्युने २८ जणाचे बळी घेतले आहे. स्वाईन फ्ल्यु पाठोपाठ आता डेंग्युने विळखा घातला आहे. मलेरिया, स्वाईन फ्लयु, डेंग्यु, चिकनगुनिया या सारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जानेवारी ते संप्टेंबर या नऊ महिन्यात डेंग्युची लागन झालेले १०३ तर १२६१ संशयीत रूग्ण आढळले आहेत. सध्या रूग्णालयात तुंबुन गर्दी पहायला मिळत आहे. महापालिकेच्या वाय सी.एम. व इतर रूग्णालयात रूग्णांना जागा उपलब्ध होत नाही. खाजगी रूग्णालय देखील तुडुंब भरले आहेत. एकुणच शहरातील नागरिकांची भयभीत स्थिती झाली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89fe1930-c89a-11e8-9e5b-232d471f550c’]

शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असुन महापालिकेचे एक अधिकारी या मध्ये मृत्यूमुखी पडले असतानांही महापालिका ही बाब गार्भीयाने घेत नसुन साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छते बरोबरच डासाचे व डेग्युचे डास निर्माण होणारे केंद्र नष्ट केली पाहिजेत. शहरामध्ये औषधाच्या फवारणी सर्वत्र करून पावसाचे पाणी साचुन डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे डासांची निर्मिती होत आहेत नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर नाल्याचे पाणी थेट जात असल्याने नदी पात्राला गटारीचे स्वरूप आले असल्याने नदी पात्रातुनही मोठ्या प्रमाणावर डास निर्मिती होत आहे. महापालिकेने औषध फवारनी करावी, औषधाचा साठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात यावा गरीब रूग्णांसाठी महापालिकेच्या सर्व रूग्णालयात सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच खासगी रूग्णालयात पेशंन्टची होत असलेली लुट थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून कमी उत्पन्न गटातील नागरिकांना जागा उपलब्ध करून देवून कमी खर्चात उपचार होण्यासाठी मदत करण्याच्या सुचना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्याचे त्यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.