सलमानने प्रियांकासोबत काम न करण्याचा घेतला निर्णय

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड मध्ये चर्चेचा विषय बनली आहे. तिने तिच्या बर्थडे च्या दिवशी कथित प्रियकर निक जोनास याच्यासोबत साखरपुडा केला आहे. निक जोनास हा प्रियांका पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. तसेच तो अमेरिकेतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. ते रेलशनशिप आहेत अश्या अनेक बातम्या आल्या होत्या. आता मात्र या दोघांनी गेल्याच आठवड्यात गुपचूप परदेशात साखपुडा उरकल्याच्या बोललं जात आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे ती आता सलमान खानच्या बिग बजेट भारत हा चित्रपट सोडणार असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.तिच्या या निर्णयामुळे मात्र चित्रपटाचे निर्माते तिच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत.प्रियांकाच्या या चुकीच्या अव्यवहारिक वागण्यामुळे तिच्यासोबत पुन्हा कधीही काम न करण्याचा निर्णय सलमाननं घेतला आहे.

प्रियांका ही साधीसुधी अभिनेत्री नसून ती ‘ग्लोबल स्टार’ आहे,तिने अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला चित्रपटांचे नियम सर्व माहित असताना तिच्याकडून अशाप्रकारच्या वागण्याची अपेक्षा कोणीही केली नव्हती.असे निर्माते म्हणाले , ‘प्रियांकानं दोन दिवसांपूर्वीच फोन करून चित्रपट न करण्याचा तिचा निर्णय आम्हाला कळवला. साखरपुड्यामुळे तिनं चित्रपटात काम न करण्याचं ठरवलं आहे. तिचं हे वागणं पूर्णपणे अव्यवहारिक आहे. अशी नाजारीची प्रतिक्रिया रिल लाईफ प्रोडक्शनचे विशेष कार्यकारी अधिकारी निखिल नमित यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. काही दिवसांपूर्वी ‘भारत’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली होती. चित्रिकरण सुरू होऊन एक आठवडाही पूर्ण होत नाही तोच प्रियांकानं तडकाफडकी या चित्रपटातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिच्या निर्णयामुळे निर्माते तर नाराज आहेत पण सलमानही कमालीचा नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे.
[amazon_link asins=’B078Y4BSZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b521c92-923a-11e8-a033-39c479f31cff’]
‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफार यांनी प्रियांकाला शुभेच्छा देत ती हा चित्रपट करणार नसल्याची घोषणा ट्विटद्वारे केली आहे. तेव्हापासून निर्माते, सलमान आणि प्रियांका यांच्यात वाद सुरू झाला आहे.भारत चित्रपटात काम न करण्याचं कारण हा मुळात निक नसून दुसरं काहीतरी असल्याचं बोललं जात आहे.‘भारत’मध्ये प्रियांकाला हवी तशी भूमिका मिळाली नाही तिच्या वाट्याला आलेली भूमिका हि फारच कमी वेळासाठीचीआहे म्हणून तिने हा चित्रपट सोडला गेल्याच चर्चा आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. नवी अभिनेत्री मिळाली नसली तरी चित्रपटाचं चित्रिकरण सुरूच ठेवण्याचा निर्णय सलमाननं घेतला आहे. त्यासाठी सलमान खान ने कतरिना कैफ किंवा जॅकलिन फर्नांडिस या दोघींपैकी एकीला घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कतरिना कैफ ने सलमान सोबत टायगर जिंदा हैं , एक था टायगर, मेन प्यार क्यू किया,या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिस ने किक आणि रेस ३ या चित्रपटांमध्ये सलमान सोबत भूमिका केली आहे. आता या दोघींपैकी कोणाची निवड होते ते येणारा काळच ठरवे.