… म्हणून लग्नानंतर पतीपासून वेगळी राहिली भाग्यश्री, सांगितलं पुन्हा कसं भेटले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार भाग्यश्री हिनं सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ सिनेमातून डेब्यू केला होता. 1989 मध्ये आलेल्या या पहिल्याच सिनेमातून तिनं लोकांच्या मनात घर केलं. हा सिनेमा आला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. यानंतर लगेचच पुढच्या वर्ष म्हणजेच 1990 साली तिनं बिजनेसमन हिमालय दासानी सोबत लग्न केलं. आता लग्नानंतर 30 वर्षांनंतर तिनं पती आणि लग्नाबद्दल काही खुलासे केले आहेत. असं काय झालं होतं की तिला पतीपासून दीड वर्ष वेगळं रहावं लागलं होतं हे तिनं सांगितलं आहे.

हिमालय दासानी फिल्म इंडस्ट्रीतील फेमस फिल्म मेकर आणि प्रोड्युसर आहे. भाग्यश्रीनं एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, त्यांचं नातं परफेक्ट नव्हतं. समोर आलेल्या व्हिडीओत भाग्यश्री म्हणत आहे की, “होय, हिमालय माझं पहिलं प्रेम होते. मी त्यांच्यासोबत लग्न केलं. परंतु एक असा काळ आला जेव्हा आम्ही वेगळं झालो.”

भाग्यश्री पुढे म्हणते, “हा तो काळ होता जेव्हा आम्ही दीड वर्षांसाठी वेगळं झालो होतो. जर मला ते भेटले नसते आणि मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असतं तर काय झालं असतं. मला आजही ते दिवस आठवतात. मला ते आठवलं की, भीतीही वाटते.” भाग्यश्रीचा हा व्हिडीओ पाहून सारेच अवाक् झाले आहेत यात शंका नाही. लग्नाच्या 30 वर्षांनंतर तिनं या सगळ्यार खुलून भाष्य केलं आहे.

भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांची भेट शाळेतच झाली होती. भाग्यश्रीनं आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हे लग्न केलं होतं. समलान खान, सुरज बडजात्या आणि हिमालय दासानीच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत एका मंदिरात दोघांचं लग्न झालं होतं.

भाग्यश्री आणि हिमालय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव अभिमन्यू आहे. 2018 साली आलेल्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमातून अभिमन्यूनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर त्यानं ‘निकम्मा’ सिनेमा केला. या सिनेमात त्याच्यासोबत शिल्पा शेट्टी दिसली होती.

मैने प्यार किया या सिनेमाबद्दल अनेक रिपोर्ट्स समोर आले होते. एका रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, या सिनेमासाठी भाग्यश्रीला सलमानपैक्षाही जास्त फी देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, या सिनेमात काम करण्यासाठी सलमान खानला 30 हजार रुपये मिळाले होते तर भाग्यश्रीला 1 लाख रुपये देण्यात आले होते.