#Video : का पहावा सलमान खानचा ‘भारत’ सिनेमा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुपरस्टार सलमान खानचा भारत हा सिनेमा उद्या म्हणजेच 5 जून रोजी रिलीज होत आहे. साऊथ कोरियन ब्लॉकबस्टर हिट सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात सलमान आणि कॅटरीना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. दिशा पाटनीही विशेष भूमिकेत दिसणार आहे. उद्या ईदच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज होत आहे.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होण्याची संभावना जास्त आहे. आपण आता अशी 5 कारणे कोणती आहेत ज्यामुळे तुम्ही हा सिनेमा पाहायला हवा त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसे पाहिले तर अजून या सिनेमाचा रिव्ह्यु येणं बाकी आहे.

1) अली अब्बास जफर यांचं दिग्दर्शन – सुपरस्टार सलमान खान आणि अली अब्बास जफर या जोडीने टायगर जिंदा है आणि सुल्तान सारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे चाहती अशी आशा करू शकतात की जोडी पुन्हा काहीतरी करून दाखवेल.

2) कॅटरीना-सलमानची केमिस्ट्री – सलमान खान जेव्हा जेव्हा कॅटरीना सोबत पडद्यावर दिसला आहे तेव्हा त्याचा सिनेमा हिट झाला आहे. सलमान आणि कॅटच्या केमिस्ट्रीबद्दल चाहत्यांना माहीतच आहे. सलमानही या गोष्टीशी सहमत आहे की, ही दोघांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीच आहे जी पडद्यावर दिसत असते.

3) अॅक्शन, रोमँस आणि इमोशनल कॉम्बिनेशन – हे एक असं समीकरण आहे जे पडद्यावर चालतंच. अनेक हिट सिनेमात याच समीकरणाचा वापर केला जातो. सलमान पुन्हा एकदा या समीकरणासोबतच परत येत आहे. सलमानचे असे मसाला सिनेमे खूपच पसंत केले जातात.

4) हिट सिनेमाचा रिमेक – हे सर्वांना माहिती आहे की, सलमान खान आणि कॅटरीना कैफ स्टारर भारत सिनेमा हा ओरिजनल कंटेट नाही तर रिमेक मूव्ही आहे. हा सिनेमा ‘ओड टू माय फादर’ या साऊथ कोरियन सिनेमाचा रिमेक आहे. त्यामुळे सिनेमाचा फॉर्म्युला ट्राईड आणि टेस्टेड आहे.

5) ईद – अनेक मोठे सुपरस्टार क्रिसमस, दीवाळी आणि ईदचा मौका पाहून आपला सिनेमा रिलीज करण्यासाठी वाट पाहतात. हे यासाठी कारण सिनेमांना मोठा विकेंड मिळतो. शिवाय लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी थिएटरमध्ये जातात. ईदची संधी तर सलमानसाठी नेहमीच बुक असते. साधारणपणे यावेळी रिलीज झालेले सलमानचे सिनेमे चालताना दिसतात.