सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रदर्शनात ‘अडथळा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सलमान खानचा भारत चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाच्या समस्या वाढल्या आहेत. चित्रपटाच्या नावामुळे दिल्ली हाईकोर्ट ला याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, ‘भारत ‘ नावामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

एएनआयच्या एका अहवालानुसार, याचिकाकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले आहे की फिल्मचे नाव बदलावे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की सलमानच्या सिनेमाचे नाव कलम 3 प्रतीक आणि नाव (अयोग्य वापराचे प्रतिबंध) कायदाचे उल्लंघन आहे. या अधिनियमानुसार भारत या शब्दाचा प्रयोग प्रोफेशनल आणि कॉमर्शियल कामांसाठी करता येणार नाही.

एका रिपोर्टनुसार असे सांगण्यात येत आहे की, तो डायलॉग देखील हटवण्यात यावा ज्या मध्ये सलमान आपल्या नावाची तुलना देशाच्या नावा बरोबर करत आहे. असे देखील याचिकाकर्त्यांनी म्हंटले आहे. हा डायलॉग चित्रपटाचा ट्रेलर बघतांना ऐकण्यात आला. याचिकाकर्त्यांनी म्हंटले की यामुळे भारतीयांच्या भावनेला ठेच पोहचली आहे.

काही दिवसांपासून सलमान खान आणि कॅटरीना कैफ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपट सलमानला पहिल्यांदा वृद्ध दाखवले आहे. चित्रपटात जैकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि सुनील ग्रोवर सारख्या स्टार्सने काम केले आहे.