मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सध्या वादात सापडले आहेत. त्यांनी ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबद्दल आवाज उठवल्याबद्दल आणि इंदिरा गांधींसंदर्भात वक्तव्य केल्यानंतर विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील मित्र पक्ष देखील त्यांच्यावर टीका करत आहेत. संजय राऊतांनी यासंबंधी दुपारी भाष्य करत आपले वक्तव्य मागे देखील घेतले. परंतु वाद शमण्याचे नाव घेत नाही. यात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेकडून राऊतांवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे.
मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की संजय राऊत हे खूप महान आहेत, त्यांनी दाऊद इब्राइमला दम देखील भरला आहे, उद्या ते इराण-अमेरिकामध्येदेखील मध्यस्थी करु शकतात. संजय राऊत यांनी जो दम दिला त्यावरुनच दम बिर्याणी नाव पडले आहे, तेच दम बिर्याणी शब्दाचे जनक आहेत. संजय राऊत यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व भारत असणे हे भारताचे भाग्य आहे असं म्हणले तरी हे खोटं ठरणार नाही.
संजय राऊत प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप लावत संदीप देशपांडे म्हणाले की संजय राऊत जी फेकमफेक करत आहेत, त्यांनी ती बंद करावी. आता संजय राऊतांचे महत्व कमी झाले आहे आणि त्यामुळे ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे चर्चेत राहू इच्छित आहेत. पक्षाचे जे सरकार आहे त्यात आता काम नाही. जो पर्यंत काम होतं तो पर्यंत उद्धव ठाकरेंनी त्यांना वापरुन घेतलं. आता प्रसिद्ध होण्यासाठी हे सगळं ते करत आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –