‘या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कमरा आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत अखरे प्रदर्शित झाली आहे. या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी भाजपा, सुशांत राजपूत, कंगणा रानौत यांसारख्या विविध मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केले आहे. यात राऊतांनी मुस्लिमांचे राजकारण करणाऱ्या ओबीसींवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, की शिवसेना हिंदुत्ववादी पार्टी आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन पुढे जात आहोत. घटनेच्या चौकटीत राहून काम करतो. या देशात कोणीही सेक्युलर नाही. सेक्युलरची भाषा करतात ते सर्वात जास्त धर्मांध असतात. सेक्युलर ही शिवी आहे. राजकारणात सेक्युलर शब्दाचा चुकीच्या अर्थाने वापर केला गेला आहे. शिवीगाळ करणे म्हणजे सेक्युलर आहे का असा सवालही संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला.

सामना अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे 

सामना अग्रलेखात पाकिस्तान नाही हिंदुस्तान आहे या देशात सगळ्यांना समान अधिकार आहे या देशात मुस्लिम राजकारणाला आमचा विरोध आहे. एकेकाळी मुस्लिमांचा मतांचा अधिकार काढून घ्या व विधान केलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, की मुसलमान यांना देशात राहण्याचा संपूर्ण हक्क आहे परंतु काही पक्ष मुसलमानांचे राजकारण करतात ते मुसलमानांना अंधारात ठेवतात. ज्या दिवशी या मतांचे राजकारण होईल तेव्हा देश पुढे जाईल, असा बाळासाहेब म्हणायचे म्हणून त्यांनी हे विधान म्हटलं होतं. एकदा मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या मग मुस्लिमांवर राज्य करणारे सगळेच पळून जातील. बाळासाहेब ठाकरेंनी विचारपूर्वक ते विधान केलं होतं.

तसंच कोर्टात साक्ष देताना भगवद्गीता वर शपथ दिली जाते हे चुकीचं आहे. देशाची घटना आहे संविधानावर शपथ घ्यायला हवी अशी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तीच आमची भूमिका आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा येत नाही असं बाळासाहेब म्हणायचे. त्यांचा मी शिष्य आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यामागं कारण असेल…

राजकारण साधुसंतांचा खेळ नाही. आम्ही तपस्या करण्यासाठी आलो नाही. राजकारणात तपस्या हवी असते. त्यातून यश मिळतं . शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा आपण राजकारण का करायचं नाही असं बाळासाहेबांनी विचारलं होतं. पण आपल्या माणसांना न्याय देण्यासाठी सत्तेत जावे लागतात. अन्यथा फक्त आंदोलन करायचं, केसेस घ्यायचं फक्त हेच झालं असत. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. देशात ज्या रीतीचा वातावरण त्याकाळी बनलं होतं तेव्हा बाळासाहेबांनी आणीबाणीला समर्थन देण्याची भूमिका घेतली . बाळासाहेबांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामागे काहीतरी कारण असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील हे जनतेचे स्वप्न होतं.

राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाची जागा घेऊ शकत नाही भाजप स्थानिक पक्षांना संपतोय का?

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाची जागा घेऊ शकत नाही. पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, झारखंड अशा अनेक राज्यांत प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाला घेतल्याशिवाय राष्ट्रीय पक्षाचा होऊ शकत नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या देशात कायद्याच्या चौकटीत राहून पक्ष चालविण्याचा अधिकार आहे. मनसेचे एकेकाळी १३ आमदार झाले होते.