Sanjay Raut On CM Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदे स्वत:ला ‘भाई’ समजतात; मग शेपूट घालून का बसतात’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On CM Eknath Shinde | कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सरळ सरळ दादागिरी करत आहेत आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:ला भाई म्हणवतात आणि शेपूट घालून शांत बसतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे भाई आहेत ना, मग त्यांनी कर्नाटक विरोधात भाईगिरी करून दाखवावी, असेही संजय राऊत यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणाले. (Sanjay Raut On CM Eknath Shinde)

 

राज्य सरकार जमिनीचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना एक क्षणही सत्तेवर थांबण्याचा अधिकारी नाही. गेल्या 55 वर्षांत महाराष्ट्राने इतके हतबल, दुबळे सरकार आणि मुख्यमंत्री पाहिला नव्हता. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई कर्नाटकला जाणार होते. पण, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यावर त्यांनी लगेच शेपूटच घातले. हे कसले मर्द आणि स्वाभिमानी? हे तर नामर्दांचे सरकार आहे, असा घाणाघात राऊत यांनी केला. कर्नाटकच्या कन्नड वेदिके रक्षणच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे या सीमावादाला हिंसक वळण लागले आहे. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त करत शिंदे सरकारला धारेवर धरले आहे.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून तीन महिन्यांत महाराष्ट्र दिल्लीच्या दारातील पाय पुसणे झाला आहे. सीमेवर वाद आणि गोंधळ आहे तसेच आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गृहमंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यांना माहीत नाही का, कर्नाटकात काय सुरू आहे? महाराष्ट्रावर अशी वेळ कधीही आली नव्हती. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे डरपोक आहे. त्यांना आपल्या सीमांची आणि जनतेची काळजी नाही. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला नाजूक करण्यासाठी प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंडाला कुलूप लावून आहेत. हे सरकार दिल्लीकडून टेंडर घेऊन आलेले सरकार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

 

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे.
महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा हा खेळ सुरू झाला आहे.
बेळगावातील हल्ले याच कटाचा भाग आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांत क्रांती झाली म्हणतात.
हीच का यांची क्रांती? महाराष्ट्र एवढा लेचापेचा कधी झाला नव्हता.
तो शिंदे आणि फडणवीस सरकारने केला आहे, असे यावेळी राऊतांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut On CM Eknath Shinde | Shivsena MP Sanjay Raut On Maharashtra CM Eknath Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी