Sanjay Raut | ‘धुळवडीला लोक भांग पितात मात्र…’; ठाकरे सरकारचे 25 आमदार संपर्कात म्हणणाऱ्या दानवेंवर राऊतांची ‘गुगली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष भाजपने अनेकवेळा हे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. अनेकदा तर भाजप (BJP) नेत्यांनी सरकार पडण्याचा मुहुर्तही सांगितला होता. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (Central Minister of State for Railways) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी, सरकारमधील 25 आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. दानवेंच्या या टीकेला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

शुक्रवारी धुळवड होती, धुळवडीला (Holi) लोक नशा करतात, भांग पितात अशी परंपरा आहे. माझ्याकडे अशी माहिती नाही की रावसाहेब दानवे भांग पितात. दानवे भांग पित नाहीत ते माझे चांगले मित्र आहेत. दिल्लीतही (Dehli) ते माझ्या शेजारी राहतात त्यांना भांगेची नशा किंवा इतर कोणती नशा करण्याची आवश्यकता पडली. तरी ते कोणत्या नशेत बोलले मला माहित नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी (Sanjay Raut) दानवेंना प्रत्युत्तर देताना निशाणा साधला.

त्यांना 25 नाहीतर 125 बोलायचं असेल, 125 आमदार महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या संपर्कात आहेत.
स्लिप ऑफ टंग झालं असेल, उद्या मी म्हणलो की, तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच.
तर तुम्ही काय म्हणाल ? पण आता होळी संपली आहे आणि नशाही उतरली असेल आणि काय बोलले ते आठवणार नाही, असं राऊत म्हणाले.

 

दरम्यान, जे 25 आमदार आहेत त्यांची नावं सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही.
पण निवडणुकीच्या (Elcection) तोंडावर ते प्रवेश करणार असल्याचं दानवे म्हणाले होते.
राऊतांनी दानवेंच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

 

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut said 50 bjp mla in our touch after raosaheb danave claim 25 mla of mva in our contact

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा