अटल पेन्शन योजनेसाठी देशातील 2.4 कोटी लोकांचे अर्ज, जाणून घ्या कोणत्या ‘प्लॅन’ला केलं अधिक ‘पसंद’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अटल निवृत्तीवेतन योजनेमध्ये एकूण नावनोंदणी संख्या 2.4 कोटीच्या पार गेली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 17 लाखाहून अधिक अटल निवृत्तीवेतन खाती उघडली गेली आहेत. अटल निवृत्तीवेतन योजना भारत सरकारद्वारे सुरू केली गेली होती, ज्याचे व्यवस्थापन पीएफआरडीए करते. या योजनेंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय खाते उघडू शकतो. या योजनेत बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडले जाऊ शकते जिथे ग्राहकांचे बचत खाते आहे.

या योजनेअंतर्गत, ग्राहकांना त्याच्या योगदानाच्या आधारावर वयाच्या 60 व्या वर्षापासून किमान 1000 ते पाच हजार रुपये प्रतिमाह पेंशन मिळते. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या जोडीदारास ही पेन्शन मिळते. दोघेही नसल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शनची रक्कम दिली जाते.

आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 260 एपीवाय सेवा प्रदात्यांमार्फत 17 लाखाहून अधिक एपीवाय खाती उघडली गेली आहेत. अशाप्रकारे, 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 2.4 कोटींच्या पुढे गेली आहे. वर्षानुवर्षे बँक प्रवर्गानुसार, अटल निवृत्तीवेतन योजनेतील अर्जांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील वर्गाबद्दल बोलायचे म्हणले तर, एसबीआयने आतापर्यंत सर्वाधिक अटल पेन्शन खाती उघडली आहेत. तर खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक, आरआरबीमध्ये आर्यटेल पेमेंट्स बँक आणि पेमेंट बँकांमध्ये एअरटेल पेमेंट बँकेने जास्तीत जास्त खाती उघडली आहेत.

20 ऑगस्ट 2020 पर्यंत या योजनेच्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास 73.38 टक्के ग्राहकांनी 1,000 रुपये पेन्शन योजनेचा पर्याय 16.93 टक्के लोकांनी 5,000 रुपयाच्या योजनेचा पर्याय निवडला आहे. एकूण ग्राहकांपैकी 43.52 टक्के महिला ग्राहक आणि 56.45 टक्के पुरुष ग्राहक आहेत. त्याचबरोबर, 52.55 टक्के सदस्य 21 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत.
image.png