कामाची गोष्ट ! SBI मध्ये ‘अकाऊंट’ असेल तर 28 फेब्रुवारीपर्यंत उरका ‘हे’ काम, अन्यथा खातं होईल ‘ब्लॉक’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर एसबीआयमध्ये तुमचे बँक खाते असेल तर, एसबीआयकडून खातेदारांना एसएमएसद्वारे महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बँकेने खातेदारांना आपले केवायसी 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. जर कोणताही ग्राहक केवायसी करत नाही तर त्या खातेदाराच्या बँक खात्यावरील व्यवहार रोखण्यात येतील. आरबीआयने सर्व बँकांना खाते केवायसी करणे आवश्यक केले आहे. केवायसी म्हणजे Know Your Customer. केवायसी करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. याशिवाय गुंतवणूक शक्य नाही, याशिवाय बँक खाते देखील सुरु करता येत नाही.
केवायसी न केल्यास व्यवहारांवर बंदी –
एसबीआयने खातेदारांना SMS अलर्ट पाठवून केवायसी पूर्ण करण्यास सांगितले आहे. SMS मध्ये सांगण्यात आले आहे की आरबीआयच्या दिशानिर्देशानुसार तुमच्या खात्यात KYC दस्तावेज अपडेट करण्यात यावे. बँकेकडून सांगण्यात आले की खातेदारांना आपले दस्तावेज घेऊन जाऊन एसबीआय शाखेशी संपर्क साधावा. केवायसी केलेले नसल्यास तुमच्या खात्यावरील व्यवहार भविष्यात रोखण्यात येतील.
केवायसीसाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे –
केवायसीसाठी ग्राहकांना आपले ओळखपत्र द्यावे लागेल. यात पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, आधार कार्ड, नरेगा कार्ड अशी काही ओळखपत्र दाखवावे लागतील. याशिवाय रहिवासाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. ज्यात टेलीफोन बिल (3 महिन्यापेक्षा जुने नसावे) बँक खाते विवरण, वीज बिल, रेशन कार्ड, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट याचा समावेश असेल. विद्यार्थी असल्यास ते त्यांच्या कोणत्या नातेवाईकांकडे राहत असतील तर त्यांचा संबंध सांगणारे घोषणा पत्र, ओळखपत्र, पत्ता याची माहिती द्यावी लागेल.