SBI नं केलं ग्राहकांना सावधान ! ‘हे’ काम केल्यास रिकामं होईल बँकेतील अकाऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ग्राहकांना नवीन स्टाइलने होणाऱ्या सायबर क्राईमविषयी सावधान केले आहे. एसबीआयने सांगितले की, ‘फसवणारे लोक ग्राहकांना कॉल करून त्यांच्या कर्जाचे ईएमआय थांबविण्यासाठी ओटीपी शेअर करण्यास सांगत आहे.’ एसबीआयने ट्विट केले आहे की, ईएमआय थांबवण्यासाठी ओटीपी शेअर करणे गरजेचे नाही. म्हणून आपला ओटीपी कोणाबरोबर शेअर करू नका. एकदा ओटीपी शेअर केल्यावर फसवणूक करणारे लोक त्वरित आपल्या खात्यातून पैसे काढून घेतील. त्यामुळे आपल्या ग्राहकांना ओटीपी शेअर न करण्याचा इशारा एसबीआयने दिला आहे.

एसबीआयने ट्वीटमध्ये माहिती दिली की, सायबर फसवणूक करणाऱ्या लोकांनी ग्राहकांना फसवण्याची नवीन पद्धत शोधली आहे. जागरूक होणे हा सायबर गुन्हेगारांना पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे. ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी शेअर करणे आवश्यक नाही त्यामुळे आपला ओटीपी शेअर करू नका. ईएमआय डिफर्मेंट योजनेबद्दल अधिक माहितीसाठी बँकेच्या साइटला भेट द्या.

कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता आरबीआयने 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कालावधीत सर्व भारतीय बँकांना / भारतीय वित्तीय संस्थांना परवानगी दिली आहे की, ग्राहकांना त्यांच्या ईएमआय पेमेंटवर 3 महिन्यांसाठी दिलासा द्यावा. आरबीआयच्या सल्ल्यानंतर सरकारसह खासगी बँकांनी याचा फायदा ग्राहकांना दिला आहे.

या सुरक्षा टिप फॉलो करा-
>> कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन परिस्थितीत फसवणूक करणारेही सक्रिय झाले असून यूपीआय आयडीमधून देणगी मागत आहे. बँक म्हणाले, फसव्या यूपीआय आयडींकडून देणगी मागणाऱ्यांपासून सावध रहा. आपल्या कष्टाने मिळवलेले पैसे देण्यापूर्वी विचार करा.
>> निधी हस्तांतरित करण्यापूर्वी पैसे घेणार्‍याची ओळख तपासा.
>> कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर तुमच्या कार्डचा तपशील कधीही सेव्ह करु नका.
>> अनावश्यक ईमेलवर आपली संवेदनशील माहिती देऊ नका.
>> कोरोना विषाणूशी संबंधित कोणतीही बातमी त्यावर क्लिक करण्यापूर्वी तपासा.
>> जेव्हा आपल्याला असा कॉल आला तर त्वरित तक्रार करा.