खुशखबर ! SBI नं बदललाय ‘हा’ नियम, 44 कोटी ग्राहकांना कर्जासाठी होणार लाभ, जाणून घ्या माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठी खुशखबर दिलीय. कोरोना काळात अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. असे असताना बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. एसबीआयने किरकोळ कर्जासाठी असलेला व्याजदराचा कालावधी रीसेट फ्रीक्वेंसीला एक वर्षांवरून हटवून सहा महिने केलाय. याचा लाभ एसबीआयच्या गृह कर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कारणासाठी कर्ज घेणार्‍या ग्राहकांना होणार आहे.

याची माहिती एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवरून दिलीय. आता ग्राहक एक वर्ष वाट न पाहताही कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकणार आहेत. एसबीआयने एमसीएलआर रीसेट फ्रीक्वेंसीचा कालावधी 6 महिन्यांचा केलाय. अगोदर ग्राहकांना व्याजदर कमी होण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागत होती.

जुलै महिन्यात दर कमी होते

सध्या एसबीआयचा एका वर्षाचा एमसीएलआर दर 7 टक्के इतका आहे. तर सहा महिन्यांचा एमसीएलआर दर 6.95 टक्के इतका आहे. जुलै महिन्यात एसबीआयने शॉर्ट टर्म एमलीएलआरच्या दरांत कपात केली होती.

जाणून घ्या, एमसीएलआर म्हणजे काय

बँकिंग क्षेत्रात नियामक आणि रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2016 पासून भारत देशात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग यांच्या आधारावर एमसीएलआरची सुरूवात केली होती. याअगोदर बँकेच्या दरावरून व्याज दर ठरवला जात होता.

आता मेट्रो शहरांत एटीएममधून महिन्याला 8 वेळा पैसे काढण्याची मुभा –

स्टेट बँक मेट्रो शहरांत एका एटीएम कार्डाद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देत आहे. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणार्‍या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. एसबीआयमधून फ्री पैसे काढण्याच्या नियमांनुसार स्टेट बँकेच्या एटीएममधून 5 वेळा आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येत आहेत. मेट्रो शहरांत मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद सहभागी आहेत.

छोट्या शहरांत एसबीआय ग्राहकांना एटीएममधून 10 वेळा पैसे काढता येणार –

याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये एसबीआयचे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. यात 5 वेळा एसबीआय मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही मर्यादा संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल केले जाऊ शकते.

10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढताना ओटीपी पाठवला जाणार –

आता याशिवाय खातेधारकाला एटीएममधून 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्याला त्याच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येतील. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसर्‍या बँकेच्या एटीएमधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.