SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ATM मधून पैसे काढण्यावर लागणार नाही कोणताही ‘चार्ज’
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्व एटीएम कार्डधारकांना मोठी भेट दिली आहे. 30 जूनपर्यंत विनामूल्य व्यवहारांची संख्या ओलांडल्यास एसबीआयने एटीएम सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते की 30 जूनपर्यंत इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.
Good news for all ATM card holders!
SBI has decided to waive the ATM Service Charges levied on account of exceeding the number of free transactions, until 30th June.#SBI #Announcement #ATM #Transactions pic.twitter.com/d34sEy4Hik— State Bank of India (@TheOfficialSBI) April 15, 2020
एसबीआयने ट्वीट करून माहिती दिली की 24 मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने 30 जूनपर्यंत एसबीआयच्या एटीएम व इतर बँक एटीएममध्ये केल्या गेलेल्या सर्व व्यवहारांचे एटीएम शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँका दरमहा आपल्या ग्राहकांना एटीएममध्ये व्यवहार करण्यासाठी काही फ्री ट्रान्झेक्शन देतात, परंतु विनामूल्य व्यवहार संपताच बँका पुढील व्यवहारांसाठी शुल्क आकारतात. बहुतेक बँका 5 ते 8 विनामूल्य एटीएम ट्रान्झेक्शन देतात. यानंतर, बँक शुल्क आकारते. एटीएम ट्रान्झेक्शन चार्जबद्दल बघितले तर स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यावर 8 विनामूल्य ट्रान्झेक्शन देते. ज्यामध्ये आपण दुसर्या बँकेच्या एटीएमसाठी तीन ट्रान्झेक्शन वापरू शकतो. तथापि, एसबीआय लहान शहरांमध्ये 10 ट्रान्झेक्शन देते.
आरबीआयच्या नियमांनुसार एटीएम ग्राहकांना दरमहा 5 व्यवहारांसाठी शुल्क भरावे लागत नाही, परंतु त्याहून अधिक म्हणजे बँक सहाव्या व्यवहारासाठी शुल्क आकारते. बॅलन्स चेक, फंड ट्रान्सफर यासारख्या नॉन-कॅश व्यवहारांना एटीएम व्यवहार मानले जाऊ नये, असे आरबीआयने स्पष्ट केले.