नवी दिल्ली : वृत्त संस्था – जनधन खात्याबाबत राजस्थानमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने एका ग्राहकाला नोटीस पाठविली आहे, ज्यानंतर बँकेलाच यावर प्रतिक्रिया देता येत नाही. वास्तविक, जनधन खात्यात ५० पैसे जमा करण्यासाठी ग्राहकाला नोटीस पाठविली गेली. या वेळेत पैसे जमा न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
राजस्थानमधील झुंझुनूच्या एका शाखेत जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीचे जनधन खाते आहे. जितेंद्रने या खात्यात एकूण १२४ रुपये जमा केले आहेत. १२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता बँकेने जीतेंद्रला नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये त्यांना ५० पैसे देण्यास सांगितले आहे. जीतेंद्र यांना शनिवारी लोकअदालत जाऊन ५० पैसे जमा करायचं आहे, तसे न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
नोटीस पाहून कोर्टातून पळाले बँक अधिकारी :
मात्र बँकेच्या या नोटीसनंतर जितेंद्रचे वडील शनिवारी निश्चित झालेल्या लोकअदालतमध्ये पोहोचले. पाठीच्या समस्येमुळे जितेंद्रला लोक अदालतमध्ये जाणे शक्य झाले नाही. ही नोटीस कोर्टात दिसताच बँक अधिकारी तेथून पळून गेले.
या प्रकरणात जितेंद्रचे वडील सांगतात की, सकाळपासूनच ते ५० पैसे जमा करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांच्या चकरा मारत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी पैसे जमा करण्यास नकार दिला आहे. त्याच वेळी जितेंद्र यांचे वकील म्हणाले की, आपण बँकेविरूद्ध कायदेशीर कारवाई आणि मानहानीचा दावा सादर करणार आहे.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- ‘वजन घटवताना अवेळी भूक लागते का? ‘या’ ४ पद्धतीने करा नियंत्रण
- वजनाचा तोल सांभाळण्यासाठी शिका कॅलरीचे गणित, ‘या’ १४ गोष्टी लक्षात ठेवा
- रक्तदाबाची सामान्य पातळी किती? सुमारे ५० टक्के लोक अनभिज्ञ
- हायपरटेन्शन आजाराची ‘ही’ आहेत ७ लक्षणे, आणि ४ गंभीर परिणाम
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती