लंडन : वृत्तसंस्था – हवामान बदलांच्या दुष्परिणामांपासून जगाला वाचवण्यासाठी वैज्ञानिकांनी मोहीम सुरु केली आहे. यासंदर्भात 20 देशांतील 300 हून अधिक वैज्ञानिक व्यक्तींनी संयुक्त घोषणापत्र जारी केले आहे. जाहीरनाम्यात लोकांना आपापल्या सरकारांविरूद्ध सामूहिक सविनय अवज्ञा आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की , हवामान बदलाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत तर पृथ्वी नष्ट होऊ शकते आणि लोकांना असह्य त्रास सहन करावा लागतो. या वैज्ञानिकांनी हवामान बदलांच्या विरूद्ध लढा देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करणार्या संस्था एक्सटिंक्शन रिबेलियन या बॅनरखाली शांतिपूर्ण निदर्शनचे समर्थन केले आहे.
हवामान बदलांविरूद्धच्या युद्धासाठी जारी केलेल्या घोषणेवर स्वाक्षरी करणार्यांमध्ये हवामानशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, अभियंता आणि रसायनशास्त्रज्ञ आहेत. हवामान बदलाच्या समस्येवर उपाय म्हणून सरकारची उदासीनता लक्षात घेता त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेवर स्वाक्षरी केलेल्या जवळपास वीस शास्त्रज्ञांनी लंडनमधील विज्ञान संग्रहालयाच्या बाहेर पांढरा कोट घालून निदर्शन केले.
Visit : Policenama.com
- बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी