‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच

प्रशासनाने केले आंदोलन अदखलपात्र

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्यचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण पहिल्या दिवशी प्रशासनाने अदखलपात्र केले. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे

याबाबत पितळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्यावर 14 मार्च गुरूवारी राञी 9 ते 9.30 दरम्यान शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालक, मालक, क्लिनर व इतरांनी हल्ला केला. शासकीय धान्याची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालक व ठेकेदारासह इतरांची या प्रकरणात पाठराखण करून पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास व त्यांच्यावर कडक कलमे न लावता त्यांना गुन्हा घडुन चार दिवस झालेनंतरही अटक केलेली नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे. धान्याची तस्करी करणाऱ्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार व पुरवठा निरीक्षकासह आरोपी करावे. प्रशासनाच्या गुन्हेगार बचाव धोरणाच्या विरोधात प्राणांतिक आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोमवारी उपोषणाचा पहिला दिवस होता. प्रशासनाने त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही. पहिल्या दिवशी उपोषण अदखलपात्र केले. त्यामुळे आज मंगळवारी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले आहे.

उपोषणास भाजप नेत्या सुवर्णा पाचपुते, मुक्तारभाई शेख, रामदास कुसाळकर, दिपक शिंदे, किरण मखरे, अ‍ॅड. रमेश जठार, सोपान निंबाळकर, प्रा.विजय शेलार, नितीन वाबळे, भाऊसाहेब गोरे, आदेशशेठ नागवडे, कांतीलाल कोकाटे, अजित पटवा, भाऊसाहेब दांडेकर, संजय क्षिरसागर, संतोष जाधव, रामा भोसले, प्रा.बाळासाहेब बळे, विजय उंडे, सुभाष शिंदे, राजेंद्र औटी, नंदकुमार बागडे आदिंनी भेटी दिल्या.