डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणाला पुन्हा कोरोनाची लागण, धारुर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड केअर सेंटरमधून डिस्जार्ज (discharge) मिळाल्याच्या दुस-याच दिवशी तरुणाला पु्न्हा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातील धारूर येथे हा प्रकार घडला आहे. एका चोरीच्या घटनेतून हा प्रकार उघडकीस आला आहे. यातून धारूर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

एका चोरीच्या प्रकरणात धारूर पोलिसांनी गुरुवारी तिघांना ताब्यात घेतले होेते.
त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार होते.
तत्पूर्वी आरोपींची कोरोना चाचणी केली.
त्यात ज्या तरुणाला कालच कोविड सेंटरमधून सुटी (discharge) दिली होती.
त्याच तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Maharashtra Unlock : सोमवारपासून अनलॉक मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षाच?

त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

माजी मंत्री, माजी खासदार शंकर नम यांचे निधन
डहाणु : पोलीसनामा ऑनलाइन – आदिवासी समाजासाठी काम करणारे डहाणु विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार, खासदार व माजी मंत्री शंकर सखाराम नम Former MP Shankar Nam (वय ७२) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने शनिवारी सकाळी निधन झाले. शंकर नम यांची शुक्रवारी तब्येत बिघडल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले.

शंकर नम Former MP Shankar Nam हे तीन वेळा डहाणु विधानसभा मतदारसंघाचे आमदार, एक वेळा खासदार तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमंत्री होते. सुधाकार नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पाटबंधारे, खार जमीन, आदिवासी विकास आदि विभागाचे राज्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले.

डहाणु तालुक्यातील तवा या आपल्या गावातील सरपंचापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. ते डहाणु पंचायत समिती सदस्य होते.
ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर डहाणु विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये आमदार म्हणून निवडून आले.
सलग तीन वेळा ते आमदार होते. १९९८ मध्ये ते डहाणु लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अल्पवधीत कोसळल्याने ते ११ महिने खासदार राहू शकले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, मुलगी असा परिवार आहे. डहाणू तालुक्यातील तवा या मूळ गावी संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.