Laxmmi Bomb : ‘…तर तलवारी निघतील !’, ‘खिलाडी’ अक्षयच्या सिनेमावर संतापले मुकेश खन्ना

पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. विविध कारणांनी हा सिनेमा वादात सापडताना दिसत आहे. सिनेमात अक्षयनं आसिफ नावाची भूमिका साकारली आहे. यावरून अनेकांनी सिनेमाला विरोध केला आहे. सिनेमाच्या टायटल वरून ही बराच राडा झाला आहे. आता अभिनेते मुकेश खन्न यांनीही (Mukesh Khanna) या सिनेमावर आक्षेप घेत टायटलवरून टीका केली आहे.

काय म्हणाले मुकेश खन्ना ?

मुकेश यांनी त्यांच्या इंसटावरून लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचं पोस्ट शेअर केलं आहे. यावेळीच त्यांनी नावाला विरोधही केला आहे. त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

मुकेश खन्ना लिहितात की, “लक्ष्मी बॉम्ब नावानं कोणताही सिनेमा रिलीज व्हायला हवाय का ? यावरून देशभर वाद विवाद सुरू आहे. काही लोक तर सिनेमा बॅन करण्याची मागणी करत आहेत. मला विचाराल तर मी सांगेन की, सिनेमा बॅन नाही .कारण अद्याप सिनेमा कोणीच पाहिलेला नाही. परंतु टायटलबद्दल विचाराल तर लक्ष्मीच्या पुढं बॉम्ब जोडणं खोडासाळपणा आहे. कमर्शियल इंटरेस्ट हा एकच विषया याामागे असल्याचं वाटत आहे. सिनेमाच्या या नावाला परवानगी द्यायला हवी ? तर कदापि नाही.”

पुढे ते म्हणाले, “तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीसस असं शीर्षक ठेवू शकता का ? नाही ना, मग लक्ष्मी बॉम्ब टायटल कसं चालणार ? असे वाद व्हावे, त्यावरून चर्चा व्हावी यासाठी असा धूर्तपणा केला जातो. हे असंच होतं आणि होत राहिल. मात्र कधीतरी हे थांबलं पाहिजे. हे केवळ जनताच थांबवू शकते. या व्यावसायिक लोकांमध्ये हिंदूंची भीती नाही. दुसऱ्या धर्मासोबत असा पंगा घेऊन दाखवा, तलवारी निघतील. म्हणून इतर धर्मांसोबत हे लोक पंगा घेत नाही. हिंदू धर्म मात्र यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. प्रत्येक निर्मात्याला वाटतं आपला सिनेमा हिट व्हावा. त्यासाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केले जातात लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमाही त्यापैकीच एक आहे. डिफ्युज करा याला.”