[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58e293d8-c2d0-11e8-bb64-a350ef15e2fe’]
पवार म्हणाले, इंधन दरवाढीमुळे आणि खनिज तेलाच्या आयातीमुळे केंद्र सरकारला सध्या झळा पोहोचत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. इथेनॉलच्या धोरणातही बदल केला आहे. त्याचाही लाभ साखर कारखानदारांनी घेतला पाहिजे. सध्या काही कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. भविष्यात सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू झाले पाहिजेत, जेणे करून खनिज तेल आयात कमी करण्यासाठी हातभार लागेल.
विरोधकांना १५ वर्षात जमले नाही ते आम्ही ४ वर्षात केले : मुख्यमंत्री
ऊस तोडणी कामगारांना द्यायच्या दराबाबत पवार म्हणाले, याबाबत करार करण्यात आला असून तो २०२० पर्यंतचा आहे. करारावर राज्य सरकार, ऊ स तोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी, साखर आयुक्त यांच्या स्वाक्षऱ्या असतात. कराराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच दरात बदल करावा, अशा मागणीचे निवेदन ऊसतोडणी कामगारांच्या संघटनेने माझ्याकडे दिले आहे. शासन, कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संघटनांनी याबाबत निर्णय करावा. याबाबत मी बैठक बोलावणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
[amazon_link asins=’B07CLQT6VV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a987d60-c2d0-11e8-b251-89c49ef28651′]