उशिरा का होईना,’सीएम’ कामाला लागले, ‘या’ बड्या नेत्याचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेवर पुन्हा एकदा टीका झाली आहे. मात्र ती खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पण उपहासात्मक प्रतिक्रिया देताना पवार यांनी ‘उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागले आहेत’ असा खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणती प्रतिक्रिया देतात यावरून नवे ‘पारायण ‘ घडणार आहे.

राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या जनादेश यात्रेमध्ये होते. याबद्दल विरोधकांकडून टीका होत असल्याबाबत पवारांना विचारले असता पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात पूर परिस्थिती गंभीर असताना, त्यांना बाहेर काढणे प्रत्येक राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे. राज्यात पूरस्थिती बिकट आहे. अनेक भागात अतिगंभीर परिस्थितीमध्ये संकटातील लोकांना प्रथम बाहेर काढले पाहीजे. आपले मुख्यमंत्री राजकीय कामात गुंतले होते. उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागलेत ही चांगलीच गोष्ट आहे. अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांला टोला लगावला आहे.

आरोग्यविषयक वृत्त