शरद पवार शेतक-यांचे नेते नसून उद्योग समुहाचे नेते : प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतक-यांना चिथावणारं वक्तव्य केले होते. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाल शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही, तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते असल्याचे सांगून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राज्यासह देशभरात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरु आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना चिथावणारं वक्तव्य केलं. दिलेली आश्वासनं पाळण्याची सरकारची नियत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवारांच्या या वक्तव्याचा प्रकाश आंबेडकरांनी समाचार घेतला. ”शेतकरी जातीवर मतदान करत राहील तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत. त्याला अन्नधान्य, शेतमाल फेकण्याशिवाय पर्याय नाही. जातीसाठी किती माती खायची हे शेतकऱ्यांनी आता ठरवलं पाहिजे,” असं आंबेडकर म्हणाले.