मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज अनेक लोक पक्ष सोडत आहेत. मात्र, जे लोक खटल्यात अडकले आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीही चिंता नाही. आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षाला लागलेल्या गळतीवर बोलत होते.
आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही.
''कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी.'' pic.twitter.com/DfXyXfF3xz— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2019
सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले, महिलांवरील अत्याचार आणि विकृत मनस्थितीवर जरब बसवण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्त्यांना महिलांना सन्मानाची वागणूक देता येत नाही ते कशी यंत्रणा चालवणार असे म्हणत त्यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली. पुढे बोलताना म्हणाले, निवडणुकांना सामोरे जाताना तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम पक्षाने केले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. नवीन चेहऱ्यांना समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने विचार केला पाहिजे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत आज महिला कार्यकर्त्यांचा उत्तम निर्धार जाणवला. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार? pic.twitter.com/3cIKyo1szk
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2019
महाराष्ट्राची दुसरी रजधानी नागपूर हे आज गुन्हेगारांचे केंद्र बनले आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देखील तिथलेच आहेत. या साऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत आज महिला कार्यकर्त्यांचा उत्तम निर्धार जाणवला असल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीला सामोरे जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना व महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने करण्याचा विचार केला जाईल.
येत्या २० तारखेला मुख्यमंत्र्यांना निवदेन देण्यात येईल यात शासनाने मदत केली तर ठीक, नाहीतर रस्त्यावर उतरण्याचे काम होईल. pic.twitter.com/sEztM0feNB— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2019
राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचे हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे.#MaharashtraFloods pic.twitter.com/2u6BONVw5H
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2019
- रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
- गरोदर महिलांच्या ‘या’ सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट
- झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
- हाय ब्लडप्रेशरला करा बायबाय, नाष्ट्यापूर्वी खावेत ३ खजूर, होतील ‘हे’ फायदे
- सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!
- चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
- मूळव्याधीची ‘ही’आहेत ६ कारणे, हे सोपे ११ उपाय केल्यास मिळेल आराम
- अंगावर शहारे का येतात ? शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे