[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e6c7adc-bc13-11e8-aff7-e38f4bd7d14e’]
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B07811Y98Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fcdd9282-bc13-11e8-a708-d1f94b3ca521′]
या प्रथेला जिंगरवाइ लावबेई असे म्हणतात. त्याचा अर्थ आदिमातेचं गाणं असा होतो. कोंगथाँग खेडं गाव गेल्या अनेक पिढ्यापासून, जगापासून अलिप्त राहिलं आहे. २००० साली या गावात वीज आली. तर, साधा मातीचा रस्ताच २०१३ साली तयार करण्यात आला. दिवसभर गावातील लोक जंगलामध्ये गवत आणि इतर वस्तू गोळा करण्यासाठी जातात त्यामुळं गावात फक्त मुलंच राहातात. जंगलामध्ये लांबलांब असणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुमारे यांची ही ३० सेंकदांची धून या लोकांना उपयोगी पडते. आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहातो. जशी पक्ष्यांना , प्राण्यांना स्वत:ची ओळख असते, ते एकमेकांशी विशिष्टप्रकारे संवाद साधतात तसेच आम्हीही साधतो, असे खोन्गसित यांनी सांगितले.