‘कोरोना’च्या संकट काळात पंतप्रधानांवर टीका योग्य नाही : संजय राऊत

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना संसर्गाच्या प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन मुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं हे पॅकेज आतापर्यंतच सर्वात मोठं पॅकेज असून, देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती. यामुळे मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघु-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशावरती कोरोना संसर्गाचे मोठे संकट असल्याने सध्या त्यांच्यावरती टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला आहे. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो, असा सर्वानी निश्चय केला तर कोणतेही लक्ष साध्य करता येऊ शकत. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगांना दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेंन स्वावलंबी भारताला गती मिळेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.