संजय राऊतांचा दावा; म्हणाले – ‘हे तर भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे तर दुसरीकडे राजकारण आरोप प्रत्यारोपाणीं भरून जात आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एक दावा केलाय. की, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने भारताचं चित्र निर्माण केले जात आहे. त्यातून भारताचे सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. यावरून असे लक्षात येते की, भारताची अर्थव्यवस्था नष्ट आणि भारताला बदनाम करण्याचे हे फार मोठं षडयंत्र असू शकते, असे राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमाशी सवांद साधला.

काय म्हणाले संजय राऊत?
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. राजकारण करण्याची आवश्यकता नाही. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभे राहिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. तर पुढे ते म्हणाले, कोरोना फैलावला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असे मद्रास हाय कोर्टाने सांगितले आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केले जात आहे, हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असे सांगत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मद्रास हाय कोर्टाने निवडणूक आयोगासंदर्भात व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. भारतात कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावे, हे योग्य नाही, असं आम्ही म्हणत होतो. देशभरातील लोक निवडणुकीच्या प्रचाराला आले. तेच लोक देशभर गेल्याने त्यांनी कोरोना विस्तारला गेला. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचे भाजपाचे नेते सांगत होते. पण चित्र वेगळे आहे, असे राऊत म्हणाले. तसेच, कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला असे आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचे काय? असा प्रश्न करत पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास हाय कोर्टाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील, असा विश्वास आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.